चिपळूण: चिपळूण शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जात होते. कालांतराने चिपळूण शहराच्या मध्येभागी असणारा नारायण तलाव बुजला आणि दगड मातीने भरून गेला होता, या तलावासाठी राज्य सरकारने तीन कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला असून त्याची निविदा देखील प्रसिद्ध झाली असल्याची माहिती माजी नगरसेवक सुनिल कुलकर्णी यांनी दिली.

कोकणचा पर्यटन विकास व्हावा यासाठी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व माजी पालकमंत्री, आमदार भास्करशेठ जाधव यांनी चिपळूण शहराला निधी उपलब्ध करून दिला .त्यानंतर पुन्हा युती शासन सत्तेवर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व माजी पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्याकडे नारायण तलावाचा विकास करण्यासाठी मी स्वतः व माजी नगरसेविका सौ. माधुरी पोटे यांनी निधीसाठी प्रयत्न केले व दीड कोटी रुपये निधी मंजूर करून प्रत्यक्ष काम पूर्ण केले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री ना. आदित्य ठाकरे यांनी नारायण तलावाच्या विकासाकरिता सुमारे तीन कोटी रुपये निधी मंजूर केला व त्याची सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन प्रत्यक्षात निविदा प्रसारित झाली आहे.

यासाठी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, चिपळूण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा, माजी नगरसेवक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. प्रसाद शिंगटे व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तसेच प्रभात व रॉयल नगरच्या नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले, असेही ते म्हणाले.

Google search engine
Previous articleतब्बल 800 जागांसाठी भरती; स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्यांसाठी मोठी संधी
Next articleगणपती उत्सवासाठी कोकणात २५०० जादा गाड्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here