प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या व रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी ची रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटल्यामुळे जगबुडी आणि वाशिष्टी खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण झाले आहे, रासायनिक सांडपाणी नदीत मिसळल्यामुळे, सोनपात्रा नदी तसेच जगबुडी आणि वाशिष्टी खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर मासे मेल्याचे समोर आले आहे, गेल्या काही महिन्यांमध्ये रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटण्याची ही तिसरी घटना आहे. मोठ्या प्रमाणावर मासे मेल्यामुळे तसेच मोठ्या प्रमाणावर नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्या भोई समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे, आता एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Google search engine
Previous articleखेड मोहाने, ऐनवली, नानावले पंचक्रोशीत वाघाचा धुमाकूळ! ग्रामस्थ व शेतकरी वर्गामध्ये कमालीची घबराट
Next articleरत्नागिरीत “ब्राउन हेरॉईन” अंमली पदार्थ जप्त, रत्नागिरी शहर गस्तीदरम्यान केली कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here